खंडोबाचे लग्न झाले तेव्हा सगळ्या पशुपक्ष्यांनी त्याला अनेक प्रकारच्या भेटी दिल्या. एका सापानेही आपल्या तोंडात एक गुलाबाचे फूल घेतले अणि तो खंडोबापाशी आला. ते पाहून खंडोबा त्याला म्हणाला, 'अरे, तू जी वस्तु मला देण्यासाठी आणली आहेस ती खूपच चांगली आहे पण ती तुझ्यासारख्या दुष्ट प्राण्याकडून घेणं मला योग्य वाटत नाही !'

तात्पर्य

- वस्तु जरी कितीही चांगली असली तरी ती देणारा मनुष्य कोणत्या दर्जाचा आहे, हा विचार करूनच, तिचा स्वीकार करावा.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel