एकदा देशात खूप मोठा दुष्काळ पडला. तेव्हा एका शेतकर्‍याने आपल्याजवळच्या कोंबड्या मारून खाल्ल्या. कोंबड्या संपल्यावर त्याने कोकरांना मारून खाण्यास सुरुवात केली. ते पाहताच सगळे बकरे एकत्र जमले आणि त्यांनी विचार केला की, कोकरे संपल्यावर शेतकरी आपल्यालाच मारून खाणार. त्याऐवजी आपण आधीच येथून पळून गेलेले बरे. असा विचार करून ते तेथून पळून गेले.

तात्पर्य

- पुढच्या संकटाची जाणीव होताच, ते टाळण्याची सावधगिरी राखणे योग्य होय.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel