एकदा एक मनुष्य प्रवास करीत असता, त्याच्या मनात देवाची थट्टा करावी असे आले व त्याने आपल्याला काय मिळेल त्याचा अर्धा हिस्सा देवास देऊ, असा नवस केला. पुढे दुसर्‍या प्रवाशाची एका खारकांची पिशवी त्याला सापडली. तेव्हा त्याने त्यातील सगळ्या खारका स्वतः खाल्ल्या व त्यांच्या बिया नेऊन त्या देवापुढे ठेवून तो म्हणाला,

'देवा, मी नवस केल्याप्रमाणे माझ्या मिळकतीतला अर्धा वाटा तुझ्यापुढे ठेवला आहे.'

तात्पर्य

- नुसते शब्द फिरवून देवालाही फसवू पहाणारे काही लबाड लोक असतात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel