एकदा एक मनुष्य प्रवास करीत असता, त्याच्या मनात देवाची थट्टा करावी असे आले व त्याने आपल्याला काय मिळेल त्याचा अर्धा हिस्सा देवास देऊ, असा नवस केला. पुढे दुसर्‍या प्रवाशाची एका खारकांची पिशवी त्याला सापडली. तेव्हा त्याने त्यातील सगळ्या खारका स्वतः खाल्ल्या व त्यांच्या बिया नेऊन त्या देवापुढे ठेवून तो म्हणाला,

'देवा, मी नवस केल्याप्रमाणे माझ्या मिळकतीतला अर्धा वाटा तुझ्यापुढे ठेवला आहे.'

तात्पर्य

- नुसते शब्द फिरवून देवालाही फसवू पहाणारे काही लबाड लोक असतात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel