एकदा ससे आणि गरुड यांच्यात भयंकर लढाई चालू होती. तेव्हा गरुडांचा पाडाव करण्याच्या कामी कोल्ह्याची मदत घेण्याचे सशांनी ठरविले. तशी त्यांनी कोल्ह्यांना विनंती केली. सशांचे सामर्थ्य किती आहे त्याचा विचार न करता ते मूर्ख कोल्हेही मदत करण्यास तयार झाले. थोड्याच वेळात गरुडांनी सशांबरोबरच कोल्ह्यांचाही पराभव केला.

तात्पर्य

- भांडणार्‍या दोन पक्षांचे बल पाहिल्याशिवाय त्यांच्या भांडणात कधी पडू नये.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel