एकदा एक तारू मुंबईजवळ एका खडकावर आपटून फुटले. तेव्हा त्यावर असलेले एक माकड समुद्रात पडून बुडू लागले. तेव्हा एका माशाला वाटले तो मनुष्यच आहे. म्हणून त्याला आपल्या पाठीवर घेऊन मासा किनार्‍याकडे निघाला. वाटेत त्याने माकडाला विचारले, 'अरे माणसा, तू कोणत्या गावचा ?'

माकडाने सांगितले, 'मी मुंबईचा?'

माशाने पुन्हा विचारले, 'गिरगावाची माहिती तुला आहे' आपण मनुष्य आहोत असे त्याच्या मनावर बिंबवावे म्हणून माकडाने उत्तर दिले, 'गिरगाव हे गृहस्थ माझे नातेवाईकच आहेत; माझे वडील आणि ते सख्खे भाऊ.'

या मूर्खासारख्या बोलण्याचा माशाला इतका राग आला की, त्याने त्या माकडाला ताबडतोब पाठीवरून फेकून दिले. त्याबरोबर ते समुद्रात बुडून मरण पावले.

तात्पर्य - खोटे बोलणे कधी न कधी उघडकीस येतेच.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel