समुद्रातील एक खेकडा एकदा सहज समुद्रकिनार्‍यावर आला. तेवढ्यात एका कोल्हाने त्याला पकडले आणि तो खेकड्याला मारून खाऊ लागला. तेव्हा मरता मरता तो खेकडा स्वतःशीच म्हणाला, 'मीच मूर्ख ! आरामात समुद्रात राहायचं सोडून जमिनीवर यायची उठाउठेव कोणी सांगितली होती ? नको ती गोष्ट केल्याने मला जीव गमावण्याची वेळ आली आहे !'

तात्पर्य

- ज्या गोष्टीशी आपला संबंध नाही, त्यात पडले म्हणजे मनुष्य संकटात सापडतो.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel