स्वर्गामध्ये युधिष्ठिरांना दुर्योधन मानाने सिंहासनावर बसलेला दिसला. आपले बंधू मात्र त्यांना तेथे दिसले नाहीत; द्रौपदीही दिसली नाही. त्यांना सखेदाश्चर्य वाटले.

जेथे हे सर्व आहेत, तेथेच मला न्या, असे ते म्हणू लागले. तेव्हा एका देवदूताने त्यांना नरकात नेले. नरकाचे दर्शन त्यांना असह्य झाले; पण तेथेच त्यांना आपले बंधू, पत्नी व आप्त भेटले. हे सर्व नरकात का? ह्यांनी पातक तरी काय केले ? असे प्रश्न युधिष्ठिरांना पडले.

स्वर्गारोहण पर्व

त्यांनी ह्या सर्वांसह नरकातच रहावयाचे ठरविले. अखेरीस धर्मदेवाने युधिष्ठिरांना सांगितले, की तू जे पाहिलेस, ती भगवान इंद्राची माया होती. तुझ्या परोपकारबुद्धीची कसोटी त्यातून पाहिली गेली. तू तीत उत्तीर्ण झालास.

तुझे बंधू, द्रौपदी आदि सर्व स्वर्गातच आहेत. त्यानंतर युधिष्ठिराचा मानवी देह नाहीसा होऊन तो परमात्म्यात विलीन झाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel

Books related to सुगम महाभारत


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
सापळा
श्यामची आई
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
खुनाची वेळ
गांवाकडच्या गोष्टी
कथा: निर्णय
पैलतीराच्या गोष्टी
मराठेशाही का बुडाली ?
लोकभ्रमाच्या दंतकथा
मृत्यूच्या घट्ट मिठीत
रत्नमहाल