येतील स्वामी कधीं कधीं ? ।
यासाठीं धाय धाय रडते बसुन अंगणामधीं मधी
फार दिवस जाउनी, गेले तरि कोणिकडे ? ।
येत्याजात्याला पुसते, पर कोणी सांगेना सुधी सुधी
संसारामधें अम्ही दोघेजणे, नाहीं तिसरे कोणी ।
त्यांतुन ते दुरदेशिं राहिले, मला टाकिली जुदी जुदी ॥२॥
रात्र होत दिड प्रहर, औशिचा मदन पेटतो जेव्हां ।
तें संकट वैर्‍यास नसावें, मी धरुं किती अवधी अवधी ? ॥३॥
मी सख्याला फार अवडती प्राणाहुन पलिकडे ।
कसें झालें भगवंता न कळे, नवल घडविता विधी विधी ॥४॥
कांहिं दिशिं घरधनी आले, मग होनाजी बाळा म्हणे ।
असाच निश्चय ठेव निरंतर सखे पतीच्या पदीं पदीं ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel