आत्माराम आपण वनमाळी ।

ज्ञानकुदळी घेऊनि वाफे चाळी ।

जाई जुई लाविल्या दोन्ही वोळी ।

निजयोगिनी शिंपिती वेळॊवेळी ॥१॥

पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण वो ।

या मळ्याचे सारखे चारी कोन हो ।

रक्षण तेथे ठेविलें पाच जण हो ।

प्राणापान व्यान उदान सम हो ॥२॥

बावन पायर्‍या रे विहीर निर्धारी ।

सतत उपसा होतसे परोपरी ।

ऎसी विहीर वोळली क्षीरसागरी हो ॥३॥

वोडवेचे चाक सत्रावी घडघडाट हो ।

सोहं दोर लाविला याला नीट हो ।

शांतीक्षमेची राहतसे मोट हो ।

निजनयना चालविला पाट हो ॥४॥

हाती खुरपे घेतले विवेकाचे ।

समूळ मूळ खुरपिले वासनेचे ।

प्रत्यक्ष फळ लाधले आत्म साचे हो ।

एका जनार्दनी माळी तेथे नाचे हो ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel