क्षत्रिय कुळवंत । श्रीअयोध्याधीश । राजाराम छत्रपती अनंतब्रह्मांडनिवासी राजे । श्रीजिवाजीपंत शेकदार ।

मौजे देहगांव तालुके अष्टपुरी । मामले पांचाळेश्वर । यांसी आज्ञापत्र । मौजे मजकुराचा वाका लिहून कळविला ।

तेथें लिहिलें कीं मनाजीराव देशमुख । हे आसुरी सेना पुंडापाळेगार मिळून गांव मारितात ।

वसाहत होऊं देत नाहींत । ब्रह्मपुरींचा मार्ग चालूं देत नाहींत । असें असल्याकारणें तुम्हांवर सहेबाची मेहेरबानी होऊन ।

मनाजी देशमुख याजला तबीब पोहोंचावयास । सरकारांतून सुभे रवाना झाले । बितपशील कलम ।

आत्मा विवेक । प्रधान स्वानुभव । सैन्याधिपति प्रबोध । सरलष्कर इतरा वैर सनदा देऊन ताबडतोब रवाना केलें आहेत ।

तर हें मौजे मजकुरीं पावतांच । अवघें पुंडपाळेगार ठार मारतील । ब्रह्मपुरीचा मार्ग चालूं लागेल ।

याजकरितां तुम्ही आपली खातरजमा राखून । साहेब कामास रुजूं राहणें । केलेली सेवा तुम्हांस मजुरा आहे ।

तर आपण हुजूर आल्यास । बंदमोक्षांतील इमान दिला जाईल । आपणसह पूर्ण निजानंदीं रंगून साहेब कामास तत्पर असणें ।

एका जनार्दनीं शरण । बहुत काय लिहिणें जाबचिठी ॥ १ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel