या पितृदोषासाठी त्रीपिंडी , नारायण बली , नागबली , केला जातो . तसेच आणखीही काही सोपे उपाय आहेत तेही केल्याने फायदा मिळतो . नारायण बली व नागबली हे दोन स्वतंत्र विधी आहेत . तीन दिवसात पहिले नारायण बली , दुसरी नागबली व तिसरे दिनी गणेशपुजन पुण्याह वाचनादी कर्म व नवग्रहांचे हवन केले जाते . त्रीपिंडी हा विधी एकाच दिवसात करता येतो.वरील विधी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर , नाशिक , नरसोबाची वाडी , वाराणसी , गोकर्ण महाबळेश्वर , गया प्रयाग , आदी ठिकाणी स्थान महात्म्यामुळे केला जातो . तसेच जेथे तुलसीची वने आहेत तेथे , वडाचे झाड , तलाव व श्री शिवमंदिर , संगमस्थान , समुद्र किनारा , पिंपळवृक्ष व शिवाचे मंदिर व नदी संगमाचे ठिकाणीही हा विधी केलेला चालतो . हल्ली हा विधी हरीहरेश्वर येथेही करतात . 


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel