आपल्याला होणारी संतती ही फक्त आणि फक्त पितरांच्या आशिर्वादानेच होते ! जर संतती होत नसेल तर जेव्हा श्राद्ध करतो तेव्हा तीन पिंड असतात त्यातील दोन नंबरचा ( मधला) पिंड संतती न होणाऱ्या स्त्रीस खाण्यास देतात ! 

 आपण जी दीपावली करतो ती देखील पितरांसाठीच असते . नुकतेच महालय व पितृपंधरवडा आटोपलेला असतो . यानंतर कोजागीरीस आकाश दीपदान करतात अर्थात आकाश कंदील लावतात .मग सुरू होते दीपावलीची धामधूम . यात पितरांस आम्ही खूप सुखी आहोत हे दाखवणे हा हेतू असतो . याचवेळी दक्षिणेकडे दीपदान करतात . यमतर्पण करतात . 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel