भारतातील मोठ्या शहरांत विशेषत : मुंबई, पुण्यासारख्या शहरांत रस्ता ओलांडणे म्हणजे एक दिव्य झाले आहे. शहरांतील वाहतूकीला शिस्त तर नाहीच नाही, शिवाय, वृद्ध आणि शाळकरी मुलांना रस्ता ओलांडतांना धोका निर्माण झाला असून जीव कधी नव्हे एवढा मुठीत धरून रस्ता पार करावा लागतो. इतर देशांमध्ये पादचाऱ्यांसाठी वेगळा वाहतूकीचा दिवा असतो. आपल्या देशात हे करणे अशक्य नाही. फक्त सरकारकडे इच्छाशक्ती हवी आणि प्रत्येक नागरिकाने ही यात स्वतःचे कर्तव्य समजून हातभार लावायला हवा. बेसुमार लोकसंख्या, छोटे रस्ते, प्रत्येकाला ऑफिसला पोहोचायची घाई, आणि यात पादचाऱ्यांचा मात्र जीव जाई. बाईक वरचे, कारमधले, ट्रक मधले लोक यांचे जीवन अमूल्य आणि बाकीच्या पादचाऱ्यांचे जीवन स्वस्त असते का? रस्ता क्रॉस करण्यासाठी वेगळे वाहतूक दिवे तर सोडाच, साधे झेब्रा क्रॉसींग सुद्धा बरेच ठीकाणी नाहीत. पादचाऱ्याच्या दृष्टीने रस्ता पार करतांना अंगावर येणाऱ्या वाहनांच्या चालकाऐवजी यम दिसत असावा. हो! सगळे यम असतात. जीव घ्यायला तत्पर असलेले.
त्यापेक्षा असे वाटते की यावर आता एकच स्वप्नवत उपाय उरला आहे : प्रत्येक पादचाऱ्या मध्ये क्रिश सारखी शक्ती यायला हवी , जेणे करून तो उड्या मारून रस्ता पार करू शकेल.

काय वाटते आपल्याला? आहे का कुठला दुसरा उपाय?
हा प्रश्न गंभीर नाही का? की आपल्या सगळ्यांच्या भावना बधीर झाल्यात?
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel